Posts

Showing posts from January, 2019

पळसंबे – बोरबेट इतिहास पाऊलखुणा

Image
   कोल्हापुर ते गगनबावडा रोडवरील आसळाज गावापासुन तीन ते चार किलोमीटर डावीकडील बाजुस गेलेनंतर सह्याद्रीच्या कुशीत गर्द वनराईत लपलेल्या ओढ्याचा नाद आपल्याला आकर्षित करतॊ. रस्त्यावरुन खाली उतरुन गेल्यानंतर आपले डोळे दिपवणारी वनराई, स्वच्छ निर्मळ शांत वाहणार निरभ्र पाणी आणि समोर दिसतात ती हिनयान पंथीय छॊट्या पण टुमदार लेण्या पळसंबे येथील ओढ्याच्या पात्रात पहुडलेल्या आहेत.            सध्याचे लेण्याचे ठिकाण हे प्राचीन तात्कालिन व्यापारी महामार्गाचा हा भाग असावा. या सर्व लेण्या जांभ्या दगडात कोरल्या आहेत. या लेण्या ऒढ्याच्या पात्राच्या वरील बाजुस असाव्यात परंतु कालाप्रमाणे पात्राशेजारील दग़डांचे सख्खलन होऊन ही लेणी पात्रात आली असावी. या लेण्यांमध्ये अर्धउठावातील स्तुप दिसुन येतात. या खडकांमधील तावदानांमध्ये अंड व वेदिका असणारे अर्धउठाव स्तुप सर्वत्र आढळतात. या प्रवाहाच्या वरीलबाजुस छॊटे चैत्यगृह व विहार आढळतो. या चैत्यगृहावरील छतावर इतर चैत्यगृहांची अर्धउठावातील प्रतिकृती (स्तुप व जाळीदार खिडक्या)आहेत. विहार व चैत्यगृहातील छत व ...

पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट

Image
  इस्लामपुर पासुन जवळचा पिकनिक स्पाट म्हटल कि नजरेस येते बहे रामलिंग बेट. इस्लामपुरपासुन आठ एक किलोमीटरवर वसलेल कृष्णामाईच्या पात्रातील छॊ ट बेट. पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर पाण्याखाली जातो. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य आहे. अनेक हनुमान उपासक श्रावणात व शनिवारी येथे गर्दी करतात. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक रामलिंग बेट येथे आहे. बेटावर जाण्याकरिता नदीतुन बेटापर्यंत जाण्यासाठी एक छॊ टा पुल पार करावा लागतो. पुलावरुन जाताना कृष्णेचे विशाल पात्र डोळ्यात भरते. बाजुचे फ़ेसाळणारे पाणी स्वागत करते, आकाशात अनेक पाणपक्षी विहरत असतात, या विश्वात प्रवेश करताना आपल्यालाही मुक्त झाल्याचा भास होतो. बेटावर काही सामाजिक संस्थेने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.            बेटावर प्रवेशकेल्यानंतर मध्यावरील उंचवट्यावर यादवकालिन सुंदर शिवालय आहे. त...

किल्ले वसंतगड

Image
             कराडपासुन आठ किलोमीटरवर किल्ले वसंतगड हा तसा दुर्लक्षित गिरीदुर्ग़ सह्याद्रीच्या बामणॊली रांगेत वसला आहे. दुसरा भोज शिलाहार राजा याने 11 -12 व्या शतकात हा किल्ला बांधला इ स 1659 मध्ये हा किल्ला छ त्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगडाला स्वराज्यामध्ये सामील करुन घेतले. शिवकालीन व पुर्व शिवकालीन इतिहासाचा साक्षिदार हा किल्ला आहे. या गडाच्या पायथ्याशी असणा-या तळबीड या गावाने सरसेनापती हंबीरराव मोहिते व रणरागिणी ताराबाई या अमुल्य रत्नांचा ठेवा महाराष्टाला दिला. ओरंगजेबाने मराठा साम्राज्यावर चढाई करताना पहिली चढाई याच किल्ल्यावर केली इ. स. 1700 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यांनी याचे नाव किली द फ़तेह असे ठेवले इ. स. 1708 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात दाखल करुन घेतला. इ.स.1808 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या गडावर जाण्याकरिता तळबिड, सुपने, वसंतगड यागावातुन रस्ते आहेत.                वस...

पोहाळे लेणी

Image
       कोल्हापुरला आलेल्या प्रत्येक पर्यट्काचा उद्देश हा ज्याप्रमाणे आई अंबाबाईचे दर्शन हा असतो. त्यानंतर त्याची आपसुक पावले श्री श्रेत्र जोतिबाकडे वळतात. जोतिबा म्हणजेच वाडी रत्नागिरीला आपण वडणगे, कुशिरे मार्गाने जोतिबाकडे जाताना जोतिबाच्या पायथ्याशी पोहाळे गावाच्या माथ्याशी पोहाळे लेणी कोल्हापुर पासुन 15 कि.मी. अंतरावर आहेत. रस्तालगतच खाली काही अंतर चालुन गेल्यानंतर डोंगराच्या कुशीत पोहाळे लेण्याचे दर्शन होते.          आपण पोहाळे लेण्याजवळ पोहचतो ही लेणी देखील गजपृष्ठकार असुन अलंकृत नाही यामुळे ती हिनयान पंथीय असावी याची ओळख पटते. आपल्या डावीकडे पाण्याची पोडी (कुंड) दिसतात.   डोंगरातुन वाहत येणारे पाणी साठवण्याची तसेच पाण्याचा निचरा होऊन वास्तु सुस्थितीत राहण्याची ही नेटकी व्यवस्था आहे. येथे वरील बाजुने प्रणाल (पन्हळ) असुन तिचे पाणी या पोडींमध्ये येते. लेण्यांमध्ये सुरुवातीस पोडी त्यानंतर आपल्याला तीन गुहा /लेण्या दिसतात. त्यानंतर आपण चैत्यगृहात येतो. गाभा-यात स्तुप आहे; त्यासमोर सध्या शंकराची पिंड व समोर नंदी ...

वैविध्यपुर्ण पिंडींचे पाटेश्वर

Image
     बरेच दिवस सहलीला जायचा घाट घातला जात होता ठिकाण ठरत नव्हत. धोकादायक, फ़ार दुरच, गर्दी-गोंगाट असणार ठिकाण असु नये अशा अटी पुर्ण करणारे ठिकाण. जवळ असणारे - शांत निर्धोक असणारे ठिकाण शोधताना दै. सकाळ मधील भटकंती सदरात वाचलेले अनवट ठिकाण पाटेश्वर चमकुन गेल नि ते पक्क केल. आमच्या पैकी कोणीही पाटेश्वर ला यापुर्वी गेल नव्हत. विजया दशमीचा दुसरा एकादशीचा दिवस आम्ही इस्लामपुरहुन सकाळी साडे सहा वाजता निघालो संपुर्ण नवरात्रीत पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यादिवशी रस्ता धुक्यात न्हाऊन गेला होता. आजुबाजुची गावे झाडे धुक्यात गडप झाली होती. सातारा MIDC पासुन देगाव रस्ता पाहुन आपण चुकीचे ठिकाण निवडले नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकली.         थोड्याच वेळात आम्ही देगाव ला पोहोचलो. तेथुन पाटेश्वरचा रस्ता गावात विचारुन पुढे  निघालो.नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाने सह्याद्रीची कुशी हिरवीगार केली होती. बाजुचे तलाव बंधारे पाण्याने ओसंडुन वाहत होते. मोरांचे आरव अशा प्रसन्न वातावरणात आमचे स्वागत करत होते.देगाव पासुन हे ठिकान तसही दुर नि शांत हो...